〇 बोधकथेची ऋखंला--कावळा आणि मैना〇

〇 *बोधकथेची ऋखंला* 〇
━━━━━━━━━━━━━━━━ 
    *कावळा आणि मैना*
पावसाळ्याचे दिवस होते, आकाशात ढग भरून आले होते. एका निंबाच्या झाडावर खूप सारे कावळे बसले होते. ते सारे कावळे झाडावर बसून काव-काव करत होते आणि एकमेकांशी भांडत होते. तितक्यात तिथे एक मैना आली आणि त्याच झाडाच्या एका फांदीवर जावून बसली. मैनेला झाडावर बसलेले पाहताच सगळे कावळे आपले भांडण विसरून एकत्र झाले व मैनेवर धावून आले. बिचारी मैना त्यांना म्हणाली,"आज खूपच अंधारून आलंय, त्यातच मी माझ्या घरट्याचा रस्ता पण विसरले आहे मला कृपा करून इथे राहू द्या." सगळे कावळे एकसुरात ओरडले,"नाही,नाही, हि आमची बसायची जागा आहे तू इथे राहू शकत नाही." मैना म्हणाली," झाडे तर ईश्वआराने सर्वासाठी बनविलेली आहेत. मी खूप छोटी आहे, तुमच्याव बहिवणीसारखी आहे मला कृपा करून इथे राहू द्या.'' कावळे म्हवणाले,'' आम्हाथला तुझ्यासारखी बहिण नको, तु देवाचे नाव घेतेस ना,मग जा त्याक ईश्व राकडे आसरा मागायला, इथे कशाला तडमडायला आलीस, तू जा नाहीतर आम्हीह तुझ्यावर तुटून पडू आणि तुझा जीव घेऊ.'' कावळे हे आपआपसात नेहमीच भांडणे करताना आपणास नेहमी पाहावयास मिळतात. नेहमी कावकाव करत एकमेकांशी भांडणे करताना रोज संध्यामकाळी आपणास ते पाहावयास मिळू शकेल.

                 मात्र दुस-या कोणत्याा पक्ष्या विरूद्ध मात्र ते एकत्र होऊन ते लढतात हे पण खरे आहे. मैनेच्या‍बाबतीतही तसेच झाले. मैनेला कावळ्यांनी जाण्यायस सांगितल्याबवर ती बिचारी तिथूनच जवळच असणा-या एका आंब्यााच्यां झाडाकडे उडत गेली व तिथे एका फांदीवर बसली. थोड्याच वेळात मोठा पाऊस पडू लागला. पावसाचे मोठमोठाले थेंब व त्या च्यााबरोबरच गाराही पडू लागल्याा. गारा देखील मोठमोठाल्या् पडू लागल्याम. गारा पडू लागल्याय व त्या  कावळ्यांना कळेना की कोठे जावे. कारण निंबाच्याय झाडावर फारसा आडोसा होत नाही. त्यांाना गारांचा मार बसू लागला. बाहेरही पडता येईना की झाडावरही बसता येईना. बंदूकीतून सोडलेल्याा गोळीसारखा गारांचा मार त्यांयना बसू लागला. इकडे मैना ज्याख झाडावर बसली होती त्या‍ आंब्याेच्याग झाडाची एक फांदी तुटून खाली पडली व नैसर्गिकपणे तेथे एक आडोसा(खोपा) तयार झाला. छोटीशी मैना त्याण खोप्याात सहजपणे बसू शकत होती. मैना आत गेली आणि तिला त्याे पावसाचा व गारांचा काहीच मार बसला नाही. रात्रभर मुसळधार पाऊस पडला.

                सकाळ झाली आणि मैना त्याि खोप्यालतून बाहेर पडली आणि तिने जे पाहिले ते आश्चणर्यचकित व दु:खद होते. रात्रीच्याा गारांच्या‍ माराने बहुतांश कावळे मृत्युलमुखी पडले होते. तिला त्यााचे खूप दु:ख झाले. तिला उडताना पाहून त्याीत मरणोन्मुरख असणा-या कावळ्याने विचारले की मैना तू जिवंत कशी यावर मैनेने उत्तर दिले,'' मी ज्यार झाडावर बसले होते तेथे बसून मी ईश्वलराची प्रार्थना केली व त्याेनेच मला या संकटातून वाचविले. दु:खात परमेश्वीरच आपली सुटका करू शकतो.

*तात्पर्य :-* ईश्वचर संकटातून सुटका करतो किंवा संकटकाळात ईश्वपर आपल्या ला सुबुद्धी देऊन संकटात मार्ग सुचवितो.
                   

Post a Comment

0 Comments