संभाळून ठेवा ते जादुई शब्द

🙏🙏 *संभाळून ठेवा ते जादुई शब्द*🙏🙏


तुम्हाला आठवतंय, जेव्हा कधी तुम्ही लहानपणी खेळताना पडलात, रडायला लागलात किंवा कोणत्यातरी वस्तूमुळे तुम्हाला लागलं, तर आई/बाबा तुम्हाला जवळ घ्यायचे आणि कोणत्यातरी दिशेला बोट दाखवून म्हणायचे 


"काही झाल नाही, तो बघ उंदीर पळाला!" आणि आपणही त्या नसलेल्या उंदराकडे बघत, लागलेलं विसरून जायचो आणि पुन्हा खेळायचो किंवा ज्या वस्तूमुळे लागलं त्या वस्तूला आई/बाबा हळूच चापट द्यायचे आणि त्या जागेकडे/वस्तूकडे डोळे वटारून म्हणायचे,

 "हाट रे, आमच्या सोनूला मारतोस काय?." आणि असं म्हंटल्यावर आपल्याला ही आनंद व्हायचा, वाटायचं की आपल्याला कोणी काही केलं तरी त्याचा समाचार घ्यायला आपले आई-बाबा आहेत आणि आपण ती जखम वा ते दुःख विसरून जायचो.


कधी आपल्याला काही चावलं आणि ते आपण आई-बाबांना दाखवायला गेलो की ते त्यावर 'फूsss' असं करून फुंकर मारायचे आणि म्हणायचे 

"काही नाही. . . आता फू  केलंय ना, मग बरं होईल हं ते."


मोठं झाल्यावर वाटायला लागलं की काय बालिशपणा होतो आपण. . . असं फू करून कधी जखम बरी होते का?


पण खरं तर एवढं मोठं होऊनही आपल्याला ह्या जादूई शब्दांची खरी ताकद कळलेलीच नसते. 


जखम 'फू' नी नाही बरी व्हायची . . . . तर त्या हळूवार 'फू' मधल्या प्रेम, माया आणि विश्वासाने बरी व्हायची.


खरं तर ते शब्द हे आपलं लक्ष त्या दुःखापासून विचलित करण्यासाठी असायचे. त्या शब्दांमुळे आपण दुःख विसरून पुन्हा एकदा दंगा करायला तयार व्हायचो. 


जसे मोठे झालो तसे आपण सो कॉल्ड 'ओपन वर्ल्ड' मध्ये आलो. कॉलेज, नोकरी, छोकरी, स्पर्धा, करियर, मान मरातब, पैसा या आणि अशा अनेक गोष्टींमध्ये गुरफटत गेलो. 


रोज अनेक शारीरिक, मानसिक जखमा व्हायला लागल्या, अनेक गोष्टी खुपू लागल्या, धर्मवाद, जातीवाद, राजकारण, व्यसनं, भोंदूगिरी, गरीबी, गुंडगिरी, उच्छृंखलता, दहशतवाद, जीवघेणी स्पर्धा लचके तोडायला लागली. . 


रोज नवी आव्हानं समोर येऊ लागली . . . रोज नव नवीन कृत्रिम गरजांना बळी पडायला लागलो . . . . अशा वेळी "काही झालं नाही, उंदीर पळाला!", 

"हाट रे, आमच्या सोनूला मारतोस काय?. . . ." असं करून त्या सर्व दुःखांकडे डोळे वटारून बघणारी जीवाभावाची माणस प्रत्येकाकडे असतात. आता "फू  केलंय ना , मग बरं होईल हां ते" असं  म्हणून  जखमांवर फुंकर माराणारी आई ,पति /पत्नी  मित्र / मैत्रिणी सखे सोबती ज्याच्या बरोबर आहेत त्याने तरी काही घाबरायच कारण नाही अस मला वाटत.


आपण कितीही मोठे झालो तरी त्या 'बालिश' वाटणाऱ्या शब्दांचं मूल्य एका कणानेही कमी होणार नाही . .


कारण ते शब्द फक्त सांत्वन करणारे नाहीत तर सामर्थ्य देणारे आहेत. आपल दुःख विसरून जगापुढे पुन्हा दिमाखात उभं राहायला शिकवणारे आहेत, आपल्या जखमा विसरून पुन्हा  खेळायला लावणारे शब्द आहेत ते. 


वर वर पोरकट वाटणाऱ्या या शब्दांमध्ये प्रेम आणि विश्वास यांचं प्रचंड सामर्थ्य आहे अस मला तरी वाटत.


म्हणून म्हणतो आपण कितीही मोठं झालो आणि कितीही मोठं संकट आलं, तरी जर का पुन्हा कोणी 

". . . . उंदीर पळाला!",

 "हाट रे. . . . " 

 “फू. . ."


.. हे शब्द उच्चारले, तर सारी संकट, सारी दुःखं पळून जातील त्या लहानपणीच्या अदृष्य उंदराप्रमाणे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी या नियतीशी दोन हात करायला, पुन्हा एकदा त्या ओपन वर्ल्ड मध्ये दंगा करायला आपण सज्ज होऊ. . . . . 


म्हणूनच म्हणतो *संभाळून ठेवा ते जादूई शब्द*.

🌹🌹🌹👏👏👏👏👏👏.

Post a Comment

0 Comments